मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये धुळ्यामधील तीन तर ठाणे व सोलापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
राज्यातील दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे ७७ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये मागील तीन दिवसात आणखी पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ झाली आहे.