मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूर येथील शाळेत वितरित करण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनामुळे १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व मुलांना सध्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास चेंबूरमधील आणिक गाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत माध्यन्ह भोजन आले होते. इयत्ता सहावी आणि सातवीमधील विद्यार्थ्यांना हे जेवण दिल्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ मुलांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. सध्या या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शताब्दी रुग्णालयातील मुख्य अधिष्ठाता सुनील पाकळे यांनी दिली.