मुंबई : एकीकडे मध्य रेल्वे प्रशासन समाज माध्यमावरून विविध ध्वनिचित्रफीती प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मात्र वास्तवात मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना मानसिक, शारीरिक यातना सहन कराव्या लागत आहेत. नुकताच डब्याअभावी एलटीटीवरून थिवीकडे जाणारी रेल्वेगाडी सोडण्यास तब्बल तीन तासांचा उशीर झाला. यात लहान मुले, वयोवृद्ध, महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्या भरगच्च भरून मार्गस्थ होत आहेत. त्यात मध्य रेल्वे अचानकपणे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलून, प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन बिघडवत आहे. गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी-थिवी रेल्वेगाडी रात्री १० वाजता सुटते. मात्र २० एप्रिल रोजी ही रेल्वेगाडी सुटण्याच्या ११ तास आधी वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार ही गाडी रात्री २ वाजता सोडण्याचे निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे महिला वर्ग, वृद्ध, लहान मुले रात्री २ वाजेपर्यंत रेल्वेगाडीच्या प्रतिक्षेत स्थानकावर खोळंबले होते. आरक्षित तिकीट न मिळालेले अनेक प्रवासी या गाडीसाठी थांबले होते. रात्रीचे ३ वाजले तरी गाडी न आल्याने प्रवाशांनी नियंत्रण कक्षाकडे विचारणा केली. त्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी स्थानकावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रेल्वेगाडी न आल्यास, इतर रेल्वेगाड्यांचा खोळंबा करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला. त्यानंतर डब्यांची व्यवस्था करून २१ एप्रिल रोजी पहाटे ५.१० वाजता सोडण्यात आली.

Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
commuters demand refunds over cancellations of ac local train due to technical glitch
आमचे पैसे परत द्या! वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द
Traffic of express trains continues on the third and fourth lines of central railway
तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेवरुन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरूच
Kalwa-Airoli Project, Mumbai, Kalwa-Airoli,
मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण
Trans Harbor route affected due to technical fault near Nerul railway station
नेरुळ येथे तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक विस्कळीत, ठाणे, ऐरोली, रबाळे सह महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली
Margaon to Panvel special trains for return journey to Konkankars Mumbai news
मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या, परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना दिलासा

हेही वाचा : सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेठीस धरले आहे. डब्याअभावी रेल्वेगाडी उशिराने येते. रेल्वे प्रशासनाकडे डबे नसतील, तर त्यांनी रेल्वेगाडीचे नियोजनच करू नये. प्रशासन प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. – सुदर्शन जाधव, प्रवासी

हेही वाचा : मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन

एलटीटी-थिवीमच्या वेळापत्रकात बदल करून, ही रेल्वेगाडी रात्री २ वाजता सुटणार होती. याबाबतची माहिती प्रवाशांना याआधीच दिली होती. मात्र, या रेल्वे गाडी मधील डब्यांच्या शंटिंगला अधिक वेळ लागल्यामुळे, ही गाडी रात्री २ ऐवजी पहाटे ५ वाजता सुटली. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे