मुंबई : पवई, तुळशी आणि विहार तलावांतील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले. दरवर्षी जुलैमध्ये पवई तलाव भरून वाहतो. मात्र, यंदा जून महिन्यातच पवई तलाव भरून वाहू लागला आहे. गाळ न काढल्यामुळे हा तलाव लवकर भरला का याबाबतही पर्यावरणवाद्यांनी शंका उपस्थित केली आहे.

पवई तलावातील गाळ काढण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्यासह पर्यावरण विभाग, मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी जुलैमध्ये पवई तलाव भरून वाहतो. मात्र, यंदा जून महिन्यातच पवई तलाव भरून वाहू लागला आहे. गाळ न काढल्यामुळे हा तलाव लवकर भरला का अशी शंका पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. पवई तलावातील प्रदुषणासंदर्भात ‘मेरी’ या संस्थेने सर्वेक्षण केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवई तलावचा परिसर ५५७ एकर आहे. या तलावात परिसरातील सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे जलपर्णी वाढली आहे. हे सांडपाणी रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. पवई, तुळशी, विहार तलावांतील गाळ काढल्यानंतर त्याची वाहतूक व साठवणुकीसंदर्भात अभ्यास अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करावा. गाळ काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत घेण्यात यावी, अशा सूचना शेलार यांनी यावेळी केली.