मुंबई : गेल्या अनेक कालावधीपासून मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या सावंतवाडी – दिवा, रत्नागिरी – दिवा रेल्वेगाड्यांचा दादर किंवा सीएसएमटीपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा विस्तार न झाल्याने मुंबईस्थित कोकणवासीयांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे.

गाडी क्रमांक ५०१०३ / ५०१०४ रत्नागिरी दादर – रत्नागिरी पॅसेंजर प्रवासी वेळेत बचत करण्यासाठी ‘झिरो बेस्ड टाइम टेबल’ राबवण्यात आले. या वेळापत्रकानुसार दादरवरून सुटणारी पॅसेंजर दिव्यावरून सोडण्यास सुरूवात झाली. तसेच सावंतवाडी – दिवा ही रेल्वेगाडीही दादर किंवा सीएसएमटीवरून सुटत नसल्याने मुंबईच्या पूर्व – पश्चिम उपनगरातील आणि वसई – विरार येथील कोकणवासियांना या पॅसेंजरचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर दिवा स्थानकात एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात पाणी भरण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या दोन रेल्वेगाड्या दिव्याऐवजी दादर किंवा सीएसएमटीवरून चालवण्याची मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

संपूर्ण मुंबईतील प्रवाशांना या दोन रेल्वेगाड्या खूप महत्त्वाच्या आणि सोयीच्या आहेत. त्यामुळे त्यांचे दिव्याऐवजी सीएसएमटीपर्यंत विस्तारीकरण केल्यास प्रवाशांना खूप फायदेशीर ठरेल. तसेच दिवा येथे रेल्वेगाडीमध्ये पाणी भरण्याची सुविधा नाही. त्यामुळे ही रेल्वेगाडी पनवेल येथे पाणी भरण्यासाठी नेली जाते. त्यामुळे पनवेल येथे रेल्वेगाडीचा खोळंबा होतो, असे कोकण रेल्वे समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी सांगितले.

हेही वाचा – पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादर – रत्नागिरी पॅसेंजर दिवा – रत्नागिरी पॅसेंजरमध्ये रूपांतरित केली. मध्य रेल्वेने रत्नागिरी – दादर पॅसेंजर गाडी दिव्याला नेऊन त्याच वेळेत दादरहून ०१०२५ / ०१०२६ दादर बलिया एक्स्प्रेस आणि ०१०२७ / ०१०२८ दादर गोरखपूर एक्स्प्रेस चालवण्यास सुरुवात केली. पूर्वी मुंबईसह गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी, वडोदरा या शहरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासीयांना दादर – रत्नागिरी पॅसेंजरचा फायदा होत होता. दादर येथे गाड्या बदली करून जाणे सहज शक्य होते. परंतु, ही गाडी दिव्याला नेल्यामुळे त्यांचा हा मार्गच बंद झाला.