लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गोरगरिबांना शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या गोवंडीमधील एका शिधावाटप दुकानावर शिवाजी नगर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. पोलिसांनी दुकानदार आणि तांदूळ घेऊन जाणाऱ्या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

आणखी वाचा-२२ हजारहून अधिक दहशवाद्यांची माहिती संकलित! ‘एनआयए’चा नवा डेटाबेस कार्यान्वित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील लोटस कॉलनी येथील शिधावाटप दुकान क्रमांक ४४/ई/४८ वर ही कारवाई करण्यात आली. या दुकानातून काही जण मोठ्या प्रमाणात तांदळाच्या गोण्या घेऊन एका मोटरगाडीत भरत असल्याचे एका महिलेने पाहिले. तिने तत्काळ याची माहिती शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिली. याबाबत माहिती मिळताच शिधावाटप अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. शिधावाटप अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिधावाटप अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तिघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.