मुंबई: राज्यातील आठ महामार्गांना जोडणाऱ्या विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी शासनाकडे पुरेसा निधी नसल्याने हा प्रकल्प आता खासगीकरणातून राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. विरार ते अलिबाग या १२६.०६ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पापैकी पालघर जिल्ह्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली दरम्यानच्या ९६.४१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर हे काम करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून भूसंपादन तातडीने करण्यासाठी ३७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विरार ते अलिबाग बहुद्देशीय मार्गिका प्रकल्प जेएनपीटी ते प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला जोडणारा आहे. याचबरोबर हा मार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८, कल्याण-मुरबाड-निर्मळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१, तळोजा बायपास मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, पनवेल-उरण महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातून प्रस्तावित आहे. पालघर जिल्ह्यातील नवघर ते पेण या तालुक्यामधील बलावली दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादन तातडीने करण्यासाठी निधीची तरतूदही केली आहे.

तरतुदीस मंजुरी

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामास बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करण्यास तसेच भूसंपादनाकरिता २२,२५० कोटी रुपये आणि यावरील व्याजापोटी १४,७६३ कोटी अशा एकूण ३७,०१३ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.