नागपूर : भारतात मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. त्यावरून अबू आझमी यांनी टीका केली. मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांचे झाले की त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे अधिकार आहेत. लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार आहे. पण, त्यांना लग्नाचा अधिकार नाही. म्हणजे लैंगिक संबंध ठेवू शकता, पण लग्न करू शकत नाही, अशी विचित्र स्थिती यामुळे निर्माण होणार आहे, अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केली.

कायद्यात दुरुस्ती करून मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या संसदीय समितीकडे हा विषय गेला आहे. समितीला मे २०२४ पर्यत देण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले, भाजपचे आमदार नितेश राणे दररोज द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. असे वक्तव्य भाजपाचे इतरही नेते करीत असतात. कडक कायदा करून अशा लोकांना शिक्षा झाल्यास ५० टक्क्यांनी कायदा-सुव्यवस्था सुधारेल, असा दावा अबू आझमी यांनी केला.

mpsc
mpsc मंत्र: गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा: पर्यावरण
UAPA, Dawood, terrorist, High Court,
दाऊद दहशतवादी घोषित म्हणून त्याच्याशी संबंधितांवर युएपीएअंतर्गत कारवाई नको – उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Loksatta explained Why farmer suicides increased at the beginning of the season
विश्लेषण: हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी आत्महत्या का वाढल्या?
mahayuti face difficulties to pass jan Suraksha act in legislature due to opposition objection
जनसुरक्षा कायदा अध्यादेशाद्वारे? विरोधकांच्या आक्षेपामुळे विधिमंडळात मंजूर करण्यात अडचणी
Notification to Municipal Corporation regarding preparation of Kumbh Mela nashik
कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महापालिकेला सूचना; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
NEET PG Exam, NEET PG Exam Rescheduled for 11 August 2024, Student Concerns Over Previous Cancellations NEET PG Exam, neet exam, neet exam in india, National Eligibility cum Entrance Test,
‘नीट-पीजी’च्या तारखेची प्रतीक्षा तर संपली, आता आव्हान परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे…
mumbai grahak panchayat opposed amendment proposed in mofa act by maharashtra government
मोफा कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती अनावश्यक! मुंबई ग्राहक पंचायतीची भूमिका  
hunger strike, Padgha Gram Panchayat,
पडघा ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराविरुद्ध ग्रामस्थांचे साखळी उपोषण, शासकीय जमिनींवरील बेकायदा बांधकामांना अभय

हेही वाचा…मुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…

आझमी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. द्वेषपूर्ण वक्तव्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. अशा लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तक्रारींची देखील आवश्यकता नाही. पोलिसांना स्वत:हून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु पोलीस देखील सत्ताधाऱ्यांपुढे हतबल आहेत. देशात हिंदू-मुस्लीम युवक-युवतींचे पूर्वीपासून लग्न होत आहेत. पण, भाजप नेते अशा लग्नांना “लव्ह जिहाद” संबोधून द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे , असेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे उपस्थित होते.