गोंदिया: बहुप्रतिक्षित गोंदिया जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. तब्बल ११ वर्षांनंतर बँकेच्या निवडणुका होत आहे. २९ जून रोजी मतदान होणार, गोंदिया जिल्हा बँकेत करिता २० संचालकांची निवड होणार ,३० तारखेला मतमोजणी होणार आहे. सहकारी बँकेच्या या निवडणुकीत ८९४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, २६ मे ते ३० मे पर्यंत फॉर्म जमा करण्याची कालावधी आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुमारे ११ वर्षांच्या कालावधीनंतर २६ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. या बँकेच्या संचालक मंडळावरील एकूण २० संचालक पदांसाठी २९ जून रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ३० जून रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ८, इतर संस्था मतदारसंघातून ७, महिला प्रवर्गातून २, ओबीसी प्रवर्गातून १, अनुसूचित जाती प्रवर्गातून १ आणि एनटी प्रवर्गातून १ संचालक निवडले जातील. या निवडणुकीत, सर्व मतदारसंघातील एकूण ८९४ मतदार २० संचालकांची निवड करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावतील.
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार, बँक संचालक पदासाठी उमेदवारांना २६ ते ३० मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रभारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या उपस्थितीत त्यांचे नामांकन गोंदिया कार्यालयात सादर करता येईल. प्राप्त झालेल्या नामांकनांची यादी दररोज दुपारी ३:०० नंतर प्रकाशित केली जाईल.
सादर केलेल्या नामांकन अर्जांची छाननी २ जून रोजी सकाळी ११ वाजे पासून केली जाईल. वैध नामनिर्देशन पत्रांची यादी ३ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. ३ ते १७ जून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे परत घेता येईल. १८ जून रोजी पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हे वाटप केली जातील आणि अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. गरज पडल्यास, २९ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. ३० जून रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल आणि मतमोजणीनंतर लगेचच निवडणूक निकाल जाहीर केले जातील.
गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी बँक
ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बँक मानली जाते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राजेंद्र जैन हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम २६ मे रोजी जाहीर झाला असला तरी, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार गेल्या काही महिन्यांपासून या निवडणुकांची तयारी करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीच्या हालचालीही तीव्र झाल्या आहेत. जसजसा काळ जाईल तसतसे निवडणुकीत नवीन समीकरणे दिसतील. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच कोण निवडणूक रिंगणात राहील आणि कोणते उमेदवार निवडणूक लढवतील याची अंतिम स्थिती स्पष्ट होईल.