अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे मंदिर २०२४ पर्यंत बांधून पूर्ण होईल असं वक्तव्यही केलं. मात्र, आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी याच अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठं विधान केलं आहे. “लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल,” असा इशारा तोगडीयांनी दिला. ते सोमवारी (६ फेब्रुवारी) नागपूरमध्ये बोलत होते.

प्रविण तोगडिया म्हणाले, “आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेला वाटतं की, देशात राम मंदिर निर्माण होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, जर लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल. त्यामुळे केंद्र सरकारने ही लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा तात्काळ तयार करावा.”

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
Chief Minister Eknath Shinde interacted with MLA Jitendra Awad
मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ
Amit Satam vs Varsha Gaikwad
“राहुल गांधी कुठे मस्ती करतो ते…”, अदाणींचा उल्लेख करताच भाजपा आमदार विधानसभेत आक्रमक; वर्षा गायकवाडांबरोबर खडाजंगी

“मोदी शाहांनी सरकारच्या अखेरच्या वर्षात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा”

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह भाजपाच्या बहुमताच्या सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. त्यांनी सरकारच्या या अखेरच्या वर्षात लोकसंख्या नियंत्रणाचा कायदाही तयार करावा. तसेच काशी आणि मथुरा मंदिर तयार करण्यासाठी आणि लव्ह जिहाद विरोधी कायदाही तयार करावा,” अशी मागणी प्रविण तोगडीया यांनी केली.

हेही वाचा : विश्लेषण: अयोध्येत आले १४० दशलक्ष वर्ष जुने शाळीग्राम; राम-जानकीच्या मूर्तींसाठी याच शिला का निवडल्या?

“राम मंदिर २५ पीढ्यांच्या बलिदानानंतर निर्माण होत आहे”

“राम मंदिर ४५० वर्षे म्हणजे २५ पीढ्यांच्या बलिदानानंतर निर्माण होत आहे. या सरकारने काशी-मथुरा मंदिर निर्माणासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला तर त्यांना नक्की यश मिळेल,” असंही तोगडीयांनी नमूद केलं.