नागपूर : दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना अधिकृतरित्या निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले तर सुरक्षेच्या दृष्टीने संमेलनाचे उद्घाटन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात करायचे नियोजन आहे.

३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ साधण्यासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधानच हवेत, अशी एक मागणी पुढे आली होती. साहित्य महामंडळाचीही अशीच इच्छा होती. अखेर या इच्छेची ‘दखल’ घेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केले आहे.

ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ISRO New chairman Dr V Narayanan
ISRO New Chairman : डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवे प्रमुख, १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
Thane District Planning Committee meeting, Thane,
ठाणे : जिल्हा “नियोजन समिती बैठकीच्या” प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्या अभावी बैठकीला मुहूर्त नाही

हेही वाचा : गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान

पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले की कसे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, पंतप्रधान येणार असतील तर सुरक्षा व्यवस्थेमुळे संमेलनस्थळी निर्माण होणारे प्रश्न व संमेलनाच्या मंचावर महामंडळाच्या शिष्टाचारानुसार बैठक व्यवस्थेत करावे लागणारे बदल, या सर्व बाबी लक्षात घेता संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवनात करायचे, त्याचे थेट प्रसारण तालकटोरा मैदानात संमेलनस्थळी करायचे, असा पर्याय आयोजकांनी सुचवला आहे.

पंडित नेहरू प्रत्यक्ष संमेलनाला आल्याची नोंद

यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. स्वागताध्यक्षपदी असलेले तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या संमेलनाला नेहरूंनी संबोधितही केले होते.

हेही वाचा : लोकसत्ता लोकांकिका : ‘पासपोर्ट’ महाअंतिम फेरीत, नागपूर विभागीय अंतिम फेरी जल्लोषात

स्थळ बदलावरून वादाची शक्यता

साहित्य संमेलनाबाबत कितीही वादप्रवाद असले तरी दरवर्षी संमेलनाला येणाऱ्या साहित्यप्रेमींची संख्या वाढतच आहे. संमेलनातील इतर सत्रांसोबतच भव्य स्वरूपात होणाऱ्या उद्घाटनाचेही साहित्यप्रेमींना आकर्षण असते. कारण, उद्घाटक व अध्यक्षांना थेट ऐकता येते. परंतु, दिल्लीतील संमेलनाचे उद्घाटन परस्पर दुसऱ्याच ठिकाणी उरकले जाणार असेल तर या निर्णयाला साहित्यप्रेमींकडून विरोध होऊ शकतो, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.

Story img Loader