यवतमाळ: महागाव तालुक्यातील पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अखेर हवाई दलाचे हेलिकॉप्टर साडेचार वाजता पोहचले. महागाव तालुक्यातील अनंतवाडी, आनंदनगर तांडा येथे पुरामुळे अडकलेल्या ४५ नागरिकांच्या बचावासाठी एसडीआरएफ पथक दाखल झाले आहे. हेलिकॅाप्टरही पोहोचले असून बचावकार्य सुरु झाले आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका नागरिकांनी केली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.