अकोला : भाजप लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील पक्ष आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. दुसऱ्याचे घर फोडून स्वत:चे घर सजवता येत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली.

अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१७ मध्ये भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. त्यामुळे भाजप कसा पक्ष आहे, याची पूर्ण जाणीव आहे. भाजपबद्दल नागरिकांमध्ये पहिल्यासारखी सहानुभूती राहिलेली नाही. भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्याचा प्रत्यय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसला दुसऱ्याच्या घरात झाकून पहायची सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले, याची मला कल्पना नाही. अजित पवार यांच्यासोबत नागपूरच्या सभेत एकत्र होतो. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते राष्ट्रवादी पक्षाला सोडून जाणार नाहीत, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा >>> गडचिरोली : २३ गुन्हे दाखल असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. बेरोजगारीमुळे तरुण त्रस्त आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांना या गंभीर प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सत्तेसाठी काही पण करण्याची सत्तापिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाने लढा उभारला आहे. एकमेकांची घरफोडण्याचे काम भाजपने सुरू केले. ‘लोटस’ हा प्रेमाचा शब्द आहे. दुसऱ्याची घरे तोडणारा नाही. केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचे काम केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला.