नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला भाजपने खंडार पाडत १६ सरपंच, ६ नगरसेवकांना पक्षात सामील करून घेतले, तर काटोल येथील खरेदी-विक्री संस्थेवर काटोल खरेदी विक्री निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचा घुव्वा उडवला आहे.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्जवला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. तर आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पॅनलने काटोल खरेदी विक्री निवडणुकीत भाजपाचा घुव्वा उडवून एकहाती विजय मिळवला आहे.

विधानसभा निवडणुकीत काटोलमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. भाजपने ही निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न सुरू होते. माजी अनिल देशमुख यांनी भाजपला धक्का दिला आहे. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित्त हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी सर्वांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते. आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार गटाचे अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे, १८ सरपंच, ९० ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आज आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपला होईल, कारण काही मत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग यांना मिळाली होती. त्यामुळे तेथील मोठ्या प्रमाणातील मते ही आता भाजपला मिळतील. या प्रवेशामुळे हिंगणा मतदार संघात पक्षाची ताकद आणखी वाढेल असेही बावनकुळे म्हणाले. यावेळी बिपीन गिरडे, विवेक इंदुरकर, विनायक खराबे, अश्विनी जिचकार, भास्कर खाडे, अमित कदम यावेळी उपस्थित होते.