लोकसत्ता टीम

गडचिरोली : सरकारी नोकरभरती बंद करून १३७ संवर्गातील शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने बाह्य स्त्रोतांच्या कंपन्यांमार्फत भरल्या जाणार आहेत. या कंपन्या भाजप नेत्यांच्या आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी केला.

Smita Sabharwal
Disability Quota : पूजा खेडकर प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्यांचा अपंग कोट्यावरच आक्षेप; म्हणाल्या, “अपंग सर्जनवर…”
st mahamandal employees salary
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला, २३० कोटी रुपये निधी वितरित
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
Thane Municipal Commissioner information about the measures to solve the traffic jam
मुख्यमंत्र्यांचे शहर अडकले वाहतूक कोंडीत, पालिका अधिकाऱ्यांना जोरबैठका सुरू
dior armani bag controversy
लाखोंची ‘Dior’ बॅग तयार होते चार हजारात? कामगारांचं होतंय शोषण; काय आहे बड्या ब्रॅंडमागचे सत्य?
Irregularities in government onion purchase two officers of Nafed arrested
सरकारी कांदा खरेदीत अनियमितता, नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी
Recruitment, MPSC,
‘एमपीएससी’कडून सरळसेवा भरती, फडणवीसांच्या घोषणेमुळे समाधान, मात्र ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन…
Dombivli Bhiwandi hookah parlours marathi news
डोंबिवली, भिवंडीत गुटखा विक्री, हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालकांवर गुन्हे

आणखी वाचा-Monsoon Update: मान्सूनच्या परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून

गडचिरोली येथे गुरुवारी कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभाग दर्शविण्यासाठी ते गडचिरोली येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. बिहार राज्याने जातनिहाय सर्वेक्षण केले आहे, असे सर्वेक्षण महाराष्ट्राने करावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अन्यथा समाजात तेढ निर्माण होऊ शकते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, संजय ठाकरे, विजय गोरडवार, रमन ठवकर, राजेंद्र वैद्य आदी उपस्थित होते.

धर्मरावबाबांना मंत्री बनायचेच होते

ईडीचा धाक दाखवत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना ईडीचा धाक दिला नव्हता. त्यांना मंत्री बनायचे होते. त्यामुळे ते भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.