लोकसत्ता टीम

वाशीम: जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, वाशीम, मानोऱ्यासह कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांसह मालेगाव तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Damage to crops on 82 thousand hectares due to hailstorm
गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

आणखी वाचा- अवकाळीचा रब्बी पिकांना तडाखा; संत्र्यासह गहू, हरभऱ्याची हानी

वाशीम जिल्ह्यात ६ मार्च रोजी सायंकाळी व रात्री अनेक भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गहू पिकाची नासाडी झाली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आला आहे. तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे अवकाळी पावसाने संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.