वर्धा : शिक्षण घेत असताना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा असंख्य विद्यार्थी ठेवतात. म्हणून शिष्यवृत्ती उपक्रम असतो. आता देशभरातील इंजिनिअरिंग शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी आर्थिक स्वरूपात चालून आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ‘एआयसीटीई’तर्फे ‘यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अकादमिक स्किल्स इंटरप्राईसस इनिशिटिव्ह’ म्हणजे ‘यशस्वी २५’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेत ५ हजार २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येइल. योजनेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या खास शाखात तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा आहे.

५ हजार २०० विद्यार्थ्यांचे लक्ष्य

अभियांत्रिकीच्या मुख्य शाखात पदवी व पदवीका अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही यशस्वी योजना आहे. योजनेत ५ हजार २०० विद्यार्थ्यांचे लक्ष्य आहे. त्यापैकी २ हजार ५९३ पदवी घेणाऱ्या व २ हजार ६०७ पदवीका म्हणजे डिप्लोमा घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. पदवी पातळीवरील विद्यार्थ्यांना दरवर्षी ५० हजार रुपयाची मदत मिळेल. तर पदवीका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ३० हजार रुपयाची मदत मिळणार. ही मदत पदवी काळात चार तर पदवीका काळातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक तीन वर्षासाठी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘एआयसीटीई’च्या वेबसाईटवर करा ऑनलाईन अर्ज

इच्छुक विद्यार्थी १५ फेब्रुवारीपर्यंत ‘एआयसीटीई’च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. आलेल्या सर्व अर्जंची पडताळणी संस्थेकडून केल्या जाणार. संस्था स्तरावर त्याची उलटतपासणी करण्यात येणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना ही रक्कम ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’द्वारे मिळणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटी आणि निकष काय? मुख्य अट म्हणजे विद्यार्थ्याने एआयसीटीई मान्यता असलेल्या संस्थेत पदवी किंवा पदवीका अभ्यासक्रमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतलेला असावा. त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक आठ लाख रुपयापेक्षा अधिक नसावे. पात्रता परीक्षा आणि पदवी-पदवीका अभ्यासक्रमच्या प्रवेशातील अंतर जास्तीतज्यास्त दोन वर्षाचे असावे. जर विद्यार्थी राखीव प्रवर्गातील असेल तर आणि त्याची निवड सामान्य श्रेणीतील गुणवत्ता यादीत झाली तर त्यास फक्त सामान्य श्रेणीत विचारात घेतल्या जाणार आहे. ही शिष्यवृत्ती फक्त मुख्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच आहे. जर विद्यार्थ्याने दुसऱ्या शाखेत बदली घेतल्यास तर तो या शिष्यवृत्ती साठी अपात्र ठरणार. आणि त्यास शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम परत करावी लागणार. हे मुख्य निकष असल्याचे नमूद आहेत.