नागपूर : नागपूरमध्ये विमानाला पक्षी धडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे विमानाचे आपातकालिन लँडिंग करावे लागले. विमानाचे नागपूर विमानतळावरून झेपवाताना किंवा विमान हवेत असताना पक्षी धडकले. वैमानिकाने कौशल्य वारून विमान सुरक्षितपणे खाली उतरवले.

या घटनांमध्ये २०१८ मध्ये रायपूर ते नागपूर आणि त्यानंतर दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला नागपूर विमानतळावर लँडिंग करताना पक्षी धडकला. त्यामुळे आपातकालिन लँडिंग झाले.

२०२३ मध्ये, नागपूर-पुणे इंडिगो विमानाला टेकऑफ करताना पक्षी धडकला. त्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले. इतर अनेक घटनांमध्ये, विमानाला पक्षी धडकताच, वैमानिकांनी विमान त्वरित धावपट्टीवर उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाचे नुकसान होऊ शकते, तसेच विमानाचे नियंत्रण देखील धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, विमानाला पक्षी धडकताच, त्वरित विमान लँडिंग करणे आवश्यक आहे.

विमान अपघाताचा इतिहास

भारतात १९६२ पासून विमान अपघातांची नोंद आहे. भारतात हवाई अपघातांचे ७ जुलै, १९६२ रोजी आलिटालिया विमानाचे अपघात झाले होते. त्यात ९४ प्रवासी ठार झाले. त्यावेळी भारतातील सर्वात घातक हवाई अपघात ठरला. १ जानेवारी, १७८ एयर इंडिया विमान सांताक्रूज विमानतळ, मुंबईवरून उड्डाण घेतल्यानंतर काही काळात अरबी समुद्रात कोसळले. त्यात २१३ लोक ठार झाले. २१ जून, १९८२ इंडियन एयरलाइन्स विमान भोपाळ विमानतळावर उतरवण्याच्या प्रयत्नात कोसळले. या अपघातात ५५ पैकी ५० प्रवाशांचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ जुलै २००० अलीन्स एअर विमान पटना विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात ६२ प्रवाशांपैकी ६० जणांचा मृत्यू झाला. ४ सप्टेंबर २००९ – एअर इंडिया एक्सप्रेस विमान मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्नाटक येथे उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात तासलेले १६६ प्रवाशांपैकी १५८ मृत्यू झाले. ७ ऑगस्ट २०२० – एअर इंडिया एक्सप्रेस विमान केरळमधील करिपूर विमानतळ (कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ) वर उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. यात १६५ प्रवाशांपैकी २१ जण मृत्यूमुखी पडले.