वर्धा : घराबाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी येईल की नाही याची शाश्वती नसल्याचे नेहमी म्हटल्या जाते. या घटनेत तसाच दुर्दैवी प्रकार घडला आहे. राहुल श्रीनाते व मंगेश राऊत हे दुचाकीने वर्धा येथून आर्वीकडे जायला निघाले होते. वाटेत मोरांगणा परिसरातून जात असताना कुत्र्याचा मृतदेह पडून असल्याचे त्यांना दिसले नाही.
हेही वाचा : गोंदिया:भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; २ महिलांचा मृत्यू
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
त्यावर त्यांची दुचाकी धडकली. दुचाकी उसळून दोघेही खाली पडले.त्यात गृहरक्षक असलेले राहुल रामकिशन श्रीनाते हे ठार झाले तर चालक मंगेश जखमी आहेत. खरांगणा पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली.