लोकसत्ता टीम

नागपूर : लठ्ठपणाबाबत मुंबईत एक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार घरात एक मनोरंजनाची वस्तू आणल्यास संबंधिताचे वर्षाला ८ किलो वजन वाढते, अशी माहिती पद्मश्री व सुप्रसिद्ध मधूमेह तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिली.

job opportunities in konkan railways recruitment in state bank of india
नोकरीची संधी : स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Top Trending Auto Vehicle in Google trending
Trending Auto Vehicle : १९५८ ची हिंदुस्थान ॲम्बेसेडर कार आता सर्वाधिक चर्चेत का? मारुतीपासून स्कोडापर्यंत; जाणून घ्या ऑटोमोबाइल क्षेत्रातील पाच टॉप ट्रेंडिंग विषय
Job Opportunity Opportunities in BPCL career
नोकरीची संधी: ‘बीपीसीएल’मधील संधी
Job Opportunity Opportunities in CISF
नोकरीची संधी: ‘सीआयएसएफ’मधील संधी
dnyanaradha multistate cooperative society case ED raids in Delhi Jalgaon and Ahmedabad
ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : ईडीकडून दिल्ली, जळगाव व अहमदाबादमध्ये छापे
Ahmednagar district central co operative bank
नोकरीची संधी: बँकेतील संधी
IIT Bombay
IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

ऑल इंडिया असोसिएशन फॉर ॲडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी संघटनेची लठ्ठपणावर आंतराष्ट्रीय परिषद नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये शनिवारी सुरू झाली. या परिषदेत डॉ. जोशी म्हणाले, जगाची लोकसंख्या ८ अब्ज आहे. त्यापैकी १ अब्ज नागरिकांना मधू्मेह आहे किंवा ते मधूमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. जुलैमध्येही एक शोध निबंध प्रकाशित झाला. त्यानुसार १०१ दशलक्ष नागरिकांना मधूमेह आहे. १३६ दशलक्ष नागरिक मधूमेहाच्या उंबरठ्यावर आहेत.

आणखी वाचा-गोंदिया: पाणीपुरी विक्रेत्याला क्रेन धडकली, जागीच सोडला जीव…

लठ्ठपणा असलेल्यांना मधूमेहाची जोखीम जास्त असते. शरीरातील चरबी ही लठ्ठपणाला कारणीभूत ठरते. सडपातळ असलेल्या व्यक्तीमध्येही लठ्ठपणाचे निदान होते. मुंबईत मनोरंजनाच्या वस्तू असलेल्या टीव्ही, मोबाईल व इतर मनोरंजनाच्या वस्तूंबाबत एक अभ्यास करण्यात आला. त्यात एका वस्तूमुळे वर्षाला व्यक्तीचे ८ किलो वजन वाढते, असे समोर आले. या वस्तूंमुळे फिरणे कमी होते, खानपानात बदल होतो, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले. याप्रसंगी सुप्रसिद्ध मधूमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता उपस्थित होते.

लठ्ठपणा, मधूमेह वाढण्याची ही आहेत कारणे…

भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्राचिन काळात भारतात बहुतांश नागरिक कृषी वा त्यावर आधारित काम करत होते. त्यामुळे शरीरयष्टी सशक्त होती. परंतु आता बैठी जीवनशैली, मनोरंजनाच्या वस्तूंमुळे श्रम कमी झाले. त्यामुळे चरबी कमीच होत नाही. त्यातून लठ्ठपणा व मधूमेह वाढत असल्याचे, डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.