चंद्रपूर : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल ४.७२ टक्क्यांनी घसरला आहे. मागीलवर्षी ९३.८९ टक्के निकाल लागला होता. यंदा ८९.१७ टक्के निकाल लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ९२.७४ टक्क्यांसह निकालात मुलींनी आघाडी घेतली. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.६९ इतकी आहे.

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ३८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात मुले १३ हजार ८८३, तर मुलींची संख्या १३ हजार ४९७ इतकी होती. त्यापैकी २७ हजार १९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १३ हजार ७६८ मुले, तर १३ हजार ४२३ मुलींचा समावेश आहे. एकूण २४ हजार २४७ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. त्यात मुले ११ हजार ७९८, तर १२ हजार ४४९ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८९.१७ इतकी आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनीच आघाडी घेतली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९२.७४, तर मुलांची ८५.६९ इतकी आहे. विज्ञान शाखेत १२ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात मुले ५७९३, तर मुली ६५९० समावेश होता.

त्यापैकी १२,३५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात मुले ५७७७, तर मुलींचा ६५७७ समावेश आहे. विज्ञान शाखेतून १२ हजार ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुले ५६२३ तर मुली ६४७० समावेश आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९८.३७ तर मुलांची ९७.३३ टक्के आहे. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.८८ टक्के लागला आहे.

कला शाखेत ६३४२ मुले, तर मुली ५७६६ अशा एकूण १२ हजार १०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ६२६२ मुले, तर मुली ५७१६ समावेश आहे. कला शाखेतून ९६१३विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ४९२३ मुली, तर ४६९० मुलांचा समावेश आहे. कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ८०.२५ आहे. यात मुले ७४.८९ तर मुलींची टक्केवारी ८६.१२ इतकी आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.९१ टक्के लागला. यावर्षी १९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ९८७ मुले तर ९३५ मुलींचा समावेश आहे. १९११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९८० मुले आणि ९३१ मुलींचा समावेश आहे. १७६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मुलांची संख्या ८८३ तर मुलींची संख्या ८८५ इतकी आहे.

मुलाच्या निकालाची टक्केवारी ९०.१० तर मुलींची ९५.०५ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेत ९९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात मुले ७५१ तर २०४ मुलींचा समावेश आहे. ९३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७३९ मुले तर १९७ मुलींचा समावेश आहे. ७६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ५९६ मुले तर १६९ मुलींचा समावेश आहे. या शाखेच्या निकालाची टक्केवारी ८१.७३ इतकी आहे. त्यात मुले ८०.६४ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८५.७८ इतकी आहे.

नागपूर विभागात चंद्रपूर तिसरा

बारावीच्या निकालात चंद्रपूर जिल्हा बोर्डात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याची टक्केवारी ८९.१७ इतकी आहे. नागपूर बोर्डात पहिल्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा आहे. त्याची टक्केवारी ९४. ०४ इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा आहे. त्याची टक्केवारी ९३.४० इतकी आहे. वर्धा जिल्ह्याने ८७. ७७ टक्के घेत चौथा क्रमांक पटकविला आहे. भंडारा जिल्हा पाचव्या स्थानी असून त्याची टक्केवारी ८७.५६ आहे. सर्वात कमी निकाल गडचिरोली जिल्ह्याचा लागला आहे. त्याची टक्केवारी ८१.७७ इतकी आहे.

तालुकानिहाय निकाल

चंद्रपूर  ९३.६७

बल्लारपूर  ९०.५

भद्रावती  ७३.९२

ब्रह्मपुरी  ९१.२८

चिमूर  ६८.७३

गोंडपिपरी  ९२.३९

कोरपना  ९३.५५

मूल  ८४.९२

नागभीड  ८५.८७

पोंभुर्णा  ९०.८७

राजुरा  ९५.४९

सावली  ९३.६५

सिंदेवाही  ८०.८५

वरोरा  ९०.३८

जिवती ९३. ६९

शाखानिहाय निकाल

विज्ञान ः ९७.८८

कला ः ८०.२५

वाणिज्य ः ९२.५१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमसीव्हीसी ः ८१.७३