नागपूर: पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागातून एस.टी.महामंडळाने सोडलेल्या ५ हजार यात्रा स्पेशल बसमधून संपूर्ण राज्यातून ८ लाख ८१ हजार प्रवाशांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुर गाठले. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २.५ लाखांनी अधिक आहे.

एस.टी.महामंडळाने यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून ५ हजार बसेच्या १७ हजार बसेस सोडल्या. त्यांच्या ५६६ फेऱ्यांमधून ०८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी प्रवास केला. यातून महामंडळाला २७ कोटी ८८ लाखांचा महसूल मिळाला.

wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

हेही वाचा >>>नागपूर: भ्रष्टाचाराचा कळस! अठरा लाख रुपये घेत परीक्षा केंद्र मालकानेच सोडवून दिले पेपर…

राज्य शासनाने दिलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवास व महिलांसाठी ५० टक्के सवलत या दोन योजनांमुळे यंदा प्रवाशी संख्या वाढली. त्यामुळे महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनेत ७ कोटी ६९ लाख रुपयांचे उत्पन्न अधिक मिळाले. ही बाब एस.टी.वर प्रवाशांचा विकास दर्शवणारी आहे, असे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले