नागपूर : शहरात मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली आले आहे. मध्यरात्री दोन ते पहाटे पाचपर्यंत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. संपूर्ण राज्यातच येत्या ४८ तासांत मान्सून सक्रीय राहणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला. तर अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबरपर्यंत मोसमी पावसाचा जोर कायम असणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Temperature maharashtra, climate change,
थंडी आणखी दोन दिवस; पुन्हा तापमान वाढणार, जाणून घ्या हवामानातील बदल कशामुळे

हेही वाचा – सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी

हेही वाचा – नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात

कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते चक्रीय स्थितीत आहे. ते पश्चिम झारखंड आणि लगतच्या भागात आहे. तसेच कमी दाबाची रेषा ही सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्रपर्यंत आहे. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत मान्सून अतिसक्रिय राहणार आहे.

Story img Loader