लोकसत्ता टीम
नागपूर: देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी निघालेल्या सैनिकांना रेल्वेतील वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने आणि विजेचा कमी दाब असल्याने तब्बल साडेअकरा तास नागपुरात अडकून पडावे लागले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ही विशेष गाडी सैनिकांना घेऊन सिकंदराबाद येथून जम्मूकडे जात होती. ही गाडी आज सकाळी ६.५८ वाजता नागपुरात स्थानकावर आली. वातानुकूलित डब्यातील यंत्रणा नादुरुस्त आणि इतर डब्यात वीज दाब कमी असल्याची बाब सैन्यदलातील अधिकाऱ्याने रेल्वे प्रशासनाला कळवली. त्यानंतर दुरुस्ती काम सुरू झाले. सव्वाअकरा वाजेपर्यंत ही गाडी फलाट क्रमांक १ वर उभी होती. परंतु बिघाड मोठा असल्याने रेल्वे यार्डमध्ये नेण्यात आली. सायंकाळी ६.२५ वाजता गाडी पुढील प्रवासाला रवाना करण्यात आली.