scorecardresearch

Premium

काँग्रेसच्या ६० वर्षांपेक्षा ९ वर्षात जास्त विकास; केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा दावा

बुलढाण्यातील गर्दे वाचनालय सभागृहात शुक्रवारी रात्री उशिरा संपलेल्या जन संवाद सभेत यादव यांनी मोदी राजवटीत झालेल्या आढावा सादर केला.

Union Minister Bhupendra Yadav claimed development narendra modi 9 years 60 years Congress
काँग्रेसच्या ६० वर्षांपेक्षा ९ वर्षात जास्त विकास; केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा दावा (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

बुलढाणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली व सेवा, सुशासन व गरिबांचे कल्याण त्रिसूत्रीद्वारे देशाने चौफेर प्रगती व विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे. काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत केवळ ९ वर्षांत ही प्रगती झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केला आहे.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

बुलढाण्यातील गर्दे वाचनालय सभागृहात शुक्रवारी रात्री उशिरा संपलेल्या जन संवाद सभेत यादव यांनी मोदी राजवटीत झालेल्या आढावा सादर केला. आर्थिक सह कृषी क्षेत्रात भारताने मोठा पल्ला गाठला. सामान्यासाठी साडेतीन घरकुले बांधण्यात आली असून ९ हजार ३०० जेनेरिक मेडिकल दुकाने कार्यान्वित झाली. पर्यावरणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे आज ४० टक्के भारतीय’ डिजिटल पेमेंट’ द्वारे व्यवहार करीत असल्याचे यादव यांनी सांगितले.

हेही वाचा… बुलढाणा: रागाच्या भरात अल्पवयीन मुलाकडून मद्यपी वडिलांचा खून

करोडो लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात हे सरकार यशस्वी ठरले आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीच्या तुलनेत मोदी सरकारने केवळ ९ वर्षांत कैक पटीने प्रगती केल्याचा दावा त्यांनी बोलून दाखविला. यावेळी आमदार संजय कुटे, श्वेता महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी तर संचालन विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे यांनी केले. यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘टायगर प्रोजेक्ट’सह अन्य काही प्रकल्प यशस्वीपणे राबविले. चित्त्यांचे पुनर्वसन हा प्रकल्पही आगामी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा आशावाद केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी येथे बोलून दाखविला.

हेही वाचा… वर्धा : सुमित वानखेडे उत्तम नेते असल्याचा आमदार दादाराव केचे यांना साक्षात्कार, म्हणाले ते सर्वांना..

जनसंवाद सभेपुर्वी आयोजित पत्र परिषदेत त्यांनी देशाच्या प्रगतीवर भाष्य केले. नऊ वर्षात देश अनेक क्षेत्रात आत्मनिर्भर झाला असून, एकट्या संरक्षण क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांचे उत्पादन भारत करत आहे. कोरोना काळात २०० कोटी नागरिकांचे लसीकरण ही एक मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. आज इंग्लंडपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले. महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून, विकासाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात आज इतिहासाची मोडतोड होत असून, असामाजिक तत्त्वांना पाठबळ देण्याचे काम विरोधी पक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी भूपेंद्र यादव यांनी केला. यावेळी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह भाजप नेते हजर होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 13:22 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×