Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Updates in Marathi : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे विजयोत्सव, तर दुसरीकडे पराभवामुळे नाराजी असे चित्र चित्र दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट एकमेकांना भिडले. या वादात तुफान दगडफेकही करण्यात आली. यात भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू, तर चाळीसच्या वर किरकोळ जखमी झाले आहेत. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

हेही वाचा… जळगाव : खडसेंची सरशी; कुर्‍हा काकोडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गावात प्रवेश करीत जल्लोषात मिरवणूक काढली. मिरवणुकीवर विरोधी गटाच्या पॅनलकडून काही लोकांनी तुफान दगडफेक केली. पोलिसांनी संशयितांची धरपकड करून सुमारे पंधरा ते वीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा… जळगाव : गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्येचा विजय; मात्र पॅनलचा पराभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाकळी ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गट एकमेकांना भिडले. विजयी उमेदवारांच्या काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर विरोधी गटाच्या पॅनलकडून काही जणांनी दगडफेक केली. यामुळे गावात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेकीत गंभीर जखमी झालेले भाजपचे कार्यकर्ते धनराज श्रीराम माळी (वय 32) यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी झालेल्यांना दाखल करण्यात आले असून, तेथे कुटुंबियांसह नातेवाइकांची प्रचंड गर्दी झाली आहे.