मनमाड : शहरातील शाकुंतल नगरात पाणी भरण्यासाठी लावलेल्या वीज मोटारीला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. पावसाअभावी शहरास टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महिन्यातून एकदाच नळाव्दारे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पाणी आल्यावर ते भरण्यासाठी मोठी लगबग असते. याच धावपळीत महिलेला प्राण गमवावे लागल्याची भावना व्यक्त होत आहे. नगरपालिकेकडून दुपारी नळाला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे जास्तीचे पाणी मिळावे यासाठी बहुतेकांकडून नळाला वीज मोटार जोडली जाते. या मोटारीला घाईत ओला हात लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा