scorecardresearch

Premium

नंदुरबार जिल्ह्यात वादळामुळे दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू

नंदुरबार-  जिल्ह्यात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ किलोमीटर वेगाने आलेल्या वादळाने दोन जणांचा बळी घेतला. तळोदा तालुक्यात झाड पडून एकाचा तर, नवापूर तालुक्यात बस आणि मालमोटार यांच्यात धडक होऊन मालमोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला. नाशिक- नवापूर बसमधील १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. वादळी वाऱ्याने अनेक पशु देखील मृत्यूमुखी पडले आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणात […]

2 kiled in accidents due to storm in Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात वादळामुळे अपघात

नंदुरबार-  जिल्ह्यात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ किलोमीटर वेगाने आलेल्या वादळाने दोन जणांचा बळी घेतला. तळोदा तालुक्यात झाड पडून एकाचा तर, नवापूर तालुक्यात बस आणि मालमोटार यांच्यात धडक होऊन मालमोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला. नाशिक- नवापूर बसमधील १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. वादळी वाऱ्याने अनेक पशु देखील मृत्यूमुखी पडले आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानीचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

जिल्ह्यात सकाळी ११ वाजेच्या सु्मारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने धुळीने समोरचे काहीच दिसेनासे झाले होते. अनेक घरांचे  पत्रे उडाले. तळोदा तालुक्यातील चिनोद येथे वादळात वडाचे झाड चारचाकीवर पडून राजेंद्र मराठे (रा.प्रतापपूर, तळोदा) यांचा मृत्यू झाला. या गाडीतील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. नवापूर तालुक्यात मासलीपाड्याजवळ नाशिक-नवापूर बस आणि मालमोटार यांच्यात धडक झाली. यात मालमोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. वादळामुळे निर्माण झालेल्या धुळीमुळे समोरील वाहन न दिसल्यानेच हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. तळोदा तालुक्यातील विहीरमाळ परिसरात जंगलात चरावयास गेलेल्या ३० ते ३५ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरांची मोठी पडझड झाली आहे. शहादा तालुक्यातील केळींच्या बागांना देखील या वादळाचा फटका बसला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two killed 10 injured in two different accidents due to storm in nandurbar district zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×