नवी मुंबई : नवी मुंबईतील एका शाळेत सहा माही परीक्षा सुरु होत्या. त्यात एका विद्यार्थिनीने कॉपी केल्याचा संशय आल्याने मुख्याध्यापिकेने तिला अन्य परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या समोर झापले. तो अपमान सहन ण झाल्याने त्या विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेत काय झाले याची चौकशी मुलीच्या पालकांनी तिच्या मैत्रिणीला केली असता शाळेतील घटना समोर आली. त्या नंतर मयत विद्यार्थिनीच्या आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी “त्या” मुख्याध्यापिके विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्या दिवशी नेमके काय घडले?

तीन तारखेला पीडित विद्यार्थिनी परीक्षेचा पेपर देऊन संध्याकाळी साडे चारच्या सुमारास  घरी आली.पेपर मराठीचा होता. त्या वेळी तिची आई कपड्यांना इस्त्री करत होती. मुलीचे डोळे रडल्या प्रमाणे लाल दिसत असल्याने काय झाले रडलीस का? अशी चौकशी तिच्या आईने केली. मात्र मोबाईल बघत असल्याचे दाखवत तिने रडली नसल्याचे सांगितले. काही वेळाने ती वरच्या माळ्यावर तिच्या खोलीत गेली. बराच वेळ झाला ती खाली न आल्याने तिला तिच्या काकूने आणि एका मैत्रिणीने जोरात आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यात तिने आतून कडी लावलेली असल्याने आत जाता येत नव्हते. म्हणून उपस्थित सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. आत प्रवेश केला असता मुलीने बेडशीटच्या सह्याने सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले होते

नेमके काय म्हणाल्या मुख्याध्यापिका जे विद्यार्थिनीला एवढे लागले कि तिने आत्महत्या केली……

तीन तारखेला पीडित विद्यार्थिनी वय सोळा ही शाळेत परीक्षेसाठी गेली होती.  तिला  कॉपी करताना पकडण्यात आले. कॉपी केली म्हणून  शाळेच्या मुख्याध्यापिका  देशमुख  यांनी ” तुम्ही झोपडपट्टीवाले कधी सुधारणार नाहीत, तुमची लायकी नाही या शाळेत शिकायची, ” असे सर्वांच्या समोर अपमानास्पद व वाईट वागणुक दिली. त्यामुळे माझ्या मुलीने घरी येवुन गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. त्यामुळे देशमुख मॅडम यांचे विरूध्द माझे मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या बद्दल तक्रार आहे. असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.