उरण: करंजा ते रेवस या पारंपरिक जलमार्गाच्या तिकीट दरात मंगळवार १२ सप्टेंबरपासून १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाने रोजचा प्रवास करणाऱ्या कामगार आणि सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

नुकताच १ सप्टेंबर पासून या प्रवासात बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपायात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती यामध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे उरण ते अलिबाग दरम्यानच्या रस्ते प्रवासातील ४० किलोमीटर मीटरचे खड्ड्यातील प्रवास वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे विना अडथळा आनंददायी प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळत आहे.

akola general coaches marathi news
आनंदवार्ता! रेल्वेचे सामान्य श्रेणीचे डब्बे आता वाढणार; महत्त्वपूर्ण बदलामुळे प्रवाशांना दिलासा
huge potholes on sion panvel highway causes traffic congestion at many places
खड्यांमुळे शीव-पनवेल महामार्गाचा वेग मंदावला, वाहनचालकांना मनस्ताप
ticketless passengers, fine, mumbai,
मुंबई : विनातिकीट प्रवाशांवर बडगा, ५२ कोटी रुपये दंड वसूल
Navi Mumbai, Potholes, highway,
नवी मुंबई : महामार्गावर खड्ड्यांचा ताप; शीव-पनवेल मार्गावर तुर्भे, वाशी उड्डाणपुलांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण
30 percent increase in monorail ridership Mumbai
मोनोरेलच्या प्रवासी संख्येत ३० टक्क्यांनी वाढ; सोमवारी दिवसभरात २१ हजार प्रवाशांनी केला प्रवास
5 crore worth of materials of forgetful passengers returned by RPF RPF launched a campaign under Operation Amanat mumbai
विसरभोळ्या प्रवाशांचे पाच कोटींचे साहित्य आरपीएफकडून परत; आरपीएफने ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत मोहीम सुरू
Significant increase in monorail ridership 18 thousand passengers traveled till seven o clock in the evening Mumbai
मोनोरेलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ; सायंकाळी सात वाजेपर्यंत १८ हजार प्रवाशांनी केला प्रवास
pravasi raja din, ST bus, passengers,
एसटी बस प्रवाशांच्या तक्रारी, समस्या ऐकल्या जाणार? काय आहे ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम जाणून घ्या…

हेही वाचा… एपीएमसीत टोमॅटोचे दर गडगडले; सोमवारी बाजारात प्रतिकिलो ५-१०रुपये, अत्यल्प दराने शेतकरी हवालदिल

उरणच्या करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस असा जलमार्गाने शेकडो वर्षांपासून प्रवास सुरु आहे. ही जलसेवा बारमाही सुरू असते. या मार्गाने १५ ते २० मिनिटात पोहचता येते. तर अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे येथे अनेक पर्यटनस्थळ पाहण्यासाठी ही याच मार्गाने ये जा करण्यासाठी मुंबई व नवी मुंबईतील प्रवासी ही प्राधान्य देत आहेत. वाहतुकदाराच्या मागणीवरून या मार्गावरील तिकीट दर वाढ करण्यात आली असल्याची माहिती करंजा बंदर निरीक्षण अनिल शिंदे यांनी दिली आहे. ही वाढ २०१६ नंतर करण्यात आली आहे.