नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजल्याने सर्वसाधारण नागरिकांमध्ये आजाराविषयी भीती निर्माण झाली होती. कालांतराने परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नव्या वर्षांत तिसऱ्या लाटेने अचानक उसळी घेतली.  त्यात नागरिक तसेच शासकीय यंत्रणा बेसावध राहिल्याने रुग्णवाढ होत राहिली. अधिकतर रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता कमी आहे.  तसेच या वेळी मृत्युदर नगण्य असल्याचेही दिसून आले आहे. सद्य:स्थितीत बाधित रुग्णांणार उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा सुसज्ज नसल्याने करोना रुग्णांना खासगी वैद्याकीय व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. मे २०२१ नंतर करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तिसऱ्या लाटेची मुंबई, ठाणे व उपनगरांमध्ये चाहूल लागल्यानंतर  ओमायक्रॉन या उत्परिवर्तित  विषाणूने डोके वर काढले. या आजाराची तीव्रता कमी आहे. तरीही सर्दी, खोकला, अंगदुखी व कमी तीव्रतेचा ताप अशी सौम्य लक्षणे दिसून येत असली तरी नागरिकांमध्ये त्याचे गांभीर्य  नाही.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City patients rely private medical care ysh
First published on: 18-01-2022 at 01:51 IST