जिल्ह्य़ातील विकासकामांना फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा: पालघर जिल्ह्यातील तालुक्यांची आमसभा गेल्या तीन वर्षांपासून झालेली नाही. याबाबत आचारसंहिता, करोना व  स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याची कारणे देण्यात येत असली तरी आमसभा न झाल्यामुळे विकासकामांना मात्र खीळ बसली आहे. वाडा पंचायत समितीची मागील आमसभा १९ ऑगस्ट २०१९ रोजी झाली होती. त्यानंतर तब्बल साडेतीन वर्षे येथील आमसभेबाबत कुणीही वाच्यता केलेली नाही. विक्रमगड, पालघर तालुक्याची आमसभा चार वर्षे झालेली नाही. अशीच परिस्थिती डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा  तालुक्यांची आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक तालुक्याची आमसभा स्थानिक आमदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आयोजित करीत असतात. या आमसभेत तालुक्यातील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच  ग्रामस्थ आपापल्या गावातील सार्वजनिक समस्या  आमदारांमार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचवीत असतात.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development works in the district are affected people representatives did not get time for three years ysh
First published on: 28-12-2022 at 00:02 IST