कासा :  पालघर जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसांपासून थंडी आणि दाट धुक्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत असून बुधवारी २८ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे महामार्गावर दोन अपघात होऊन वाहतूक जवळपास चार तास विस्कळीत झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर मेंढवन खिंडीत टँकरचालकाला धुक्यामुळे वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे बेंझीन हे रसायन घेऊन जात असलेला टँकर महामार्गावर उलटला. महामार्गावर टँकर उलटल्यानंतर जवळपास चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती. बेंझीन हे रसायन घातक व ज्वलनशील असल्या कारणाने पोलिसांनी खबरदारी म्हणून महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक काही काळ बंद ठेवली होती. टँकर उलटल्यानंतर टँकरमधील वाहनचालक व इतर दोन व्यक्ती किरकोळ जखमी अवस्थेत टँकरमधून सुरक्षित बाहेर पडले. त्यानंतर टँकरने पेट घेतला. या आगीमध्ये रसायन घेऊन जाणारा टँकर भस्मसात झाला.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fog national highway accidents occurred at two places traffic disrupted ysh
First published on: 29-12-2022 at 00:02 IST