वाडा : बुधवारपासुन शाळा सुरू झाल्या आहेत, वाडा तालुक्यातील अनेक गावे, खेडय़ांमध्ये माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा नसल्याने येथील विद्यार्थी एसटी बसने तालुका मुख्यालयी ये-जा करून शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांच्या प्रवासासाठी आवश्यक तेवढय़ा बसफेऱ्या नसल्याने या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षीचे शैक्षणिक वर्ष म्हणजेच शाळा १५ जूनपासून सुरू होतील असे शासनाकडून आधीच जाहीर केले होते. याची खबरदारी घेऊन एसटी महामंडळाने खेडोपाडय़ात जाणाऱ्या बसफेऱ्या वाढविणे अपेक्षित होते. मात्र गेले अनेक महिने भारमान (कमी उत्पन्न) अभावी बंद केलेल्या बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानव विकासअंतर्गत लाखो रुपये खर्च करून प्रत्येक एसटी बस आगारात बसगाडय़ा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र या बसगाडय़ांची संख्या अत्यंत कमी असल्याने अनेक मार्गावर त्या धावत नाहीत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School starts bus service plight village students inadequate development buses amy
First published on: 18-06-2022 at 00:03 IST