पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस

पालघर जिल्ह्यात विक्रमगड जव्हार व मोखाडा तालुक्यात काल रात्री मुसळधार पावसाच्या दोन सरी झाल्याने आंबा, काजू, तृणधान्य तसेच वीट भट्ट्यांचे नुकसान झाले.

rain in palghar

पालघर जिल्ह्यात विक्रमगड जव्हार व मोखाडा तालुक्यात काल रात्री मुसळधार पावसाच्या दोन सरी झाल्याने आंबा, काजू, तृणधान्य तसेच वीट भट्ट्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील अधिकतर भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास जव्हार, विक्रमगड येथे मुसळधार तर वाडा, मोखाडा व तलासरी भागात किरकोळ स्वरूपात पाऊस झाला. या पावसामुळे फळ पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वातावरणामुळे शेती, बागायती, भाजीपाला वर रोगराई पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 18:46 IST
Next Story
बोईसर: तारापूर एमआयडीसीतील बंद कारखान्यातील भंगार चोरीचा डाव उधळला
Exit mobile version