Rahul Gandhi vs Abhishek Benerjee: येत्या काही महिन्यांत बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाची धुरा कोण सांभाळणार हे निश्चित होऊ शकते. दोन वंशज, त्यांचे दोन शक्तिशाली नेते आणि दोन वारसदार या तीन गोष्टी वगळल्या तर तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यात कोणतंही साम्य दिसून येत नाही. अभिषेक बॅनर्जी यांनी पुन्हा पक्षाच्या कारभाराची जबाबदारी हाती घेतली आहे, ज्यावेळी तृणमूल काँग्रेस पक्ष त्यांचा राष्ट्रीय दृष्टिकोन जाहीर करतो त्यावेळी अभिषेक त्याचं नेतृत्व करतात. पहलगाम हल्ल्यानंतर परदेशात पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळांमध्ये अभिषेक बॅनर्जीदेखील सामील होते. या दौऱ्यादरम्यानच्या भाषणानंतर अभिषेक यांनी केवळ तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची प्रतिमाच विकसित केली नाही तर राजकीय वर्तुळात त्यांची दखल घेण्यासही भाग पाडले.

सुदीप बंदोपाध्याय आणि युसूफ पठाण यांच्या जागी बॅनर्जी यांची निवड करण्यात आली, कारण अभिषेक बॅनर्जी हे राष्ट्रवादाच्या मुद्द्याला पुढे नेणारे नेते आहेत, या कारणाने तृणमूल काँग्रेसने त्यांची निवड केली. परदेश दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “मायदेशात भाजपाशी लढत राहू, मात्र परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करू.” परदेश दौऱ्यावरून परतल्यावर अभिषेक यांनी वेळ वाया न घालवता केंद्र सरकारला धारेवर धरले. पहलगाम हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारला त्यांनी पाच प्रश्न विचारले. पहलगाममधील दहशतवादी कुठे आहेत आणि त्यांना पकडण्यात यश मिळालं आहे की नाही, अशा संदर्भातले प्रश्न त्यांनी विचारले. यावरून हे लक्षात येतं की, संसदेत तृणमूल काँग्रेस हा मुद्दा सरकारविरोधात लवून धरेल.

जेव्हापासून केंद्र सरकारने शिष्टमंडळ परदेशात पाठवून दहशतवादाविरोधात एक बहुपक्षीय पाऊल उचलले, तेव्हापासून काँग्रेसने टीका करायला सुरुवात केली. अभिषेक बॅनर्जी यांनी जे प्रश्न विचारले आहेत ते यापूर्वी अनेकदा काँग्रेस पक्षानेही उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारला विचारले होते की त्यांनी पाकिस्तानशी युद्धविराम करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा खरा आहे की खोटा. असं असताना एअर इंडिया अपघात ही भारतातील आणखी एक दु:खद घटना आहे. केंद्र सरकारने पाठवलेले शिष्टमंडळ दौऱ्यावर असताना काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या पक्षातील शिष्टमंडळात सामील नेत्यांविरुद्ध टीका केली होती. काँग्रेसचे शशी थरूर हे भाजपाचे पोस्टमन आहेत, अशी टीका त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी केली होती. दरम्यान, शिष्टमंडळं परदेशात असताना त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. त्यानंतर मात्र राहुल गांधी काहीसे शांत झाले. सर्व शिष्टमंडळं परतल्यानंतर त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया आणि अनुभव सांगितले.

अभिषेक बॅनर्जींचे पाच प्रश्न

  • चार दहशतवादी सीमेवरून घुसखोरी करून २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेणारा हल्ला कसा करू शकले? राष्ट्रीय सुरक्षेतील या मोठ्या उल्लंघनाची जबाबदारी कोणाची?
  • हल्ल्यानंतर जेमतेम एक महिन्याने गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना एक वर्षाची मुदतवाढ का देण्यात आली? त्यांना जबाबदार धरण्याऐवजी त्यांना बक्षीस का देण्यात आले, अशी काय सक्ती आहे?
  • या क्रूर, धर्म-आधारित हत्याकांडासाठी जबाबदार असलेले चार दहशतवादी कुठे आहेत, ते मृत आहेत की जिवंत?
  • भारत पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर कधी परत घेणार? युद्धविरामाबाबत मध्यस्थी केलेल्या अमेरिकेच्या दाव्याबाबत सरकार मौनात का?
  • गेल्या एका महिन्यात पहलगामनंतर ३३ देशांशी संपर्क साधून किती देशांनी भारताला स्पष्ट पाठिंबा दिला आहे?

पहलगामबाबत सरकारला प्रश्न विचारणारा आवाज अचानक शांत झाल्यावर अभिषेक बॅनर्जी संधी साधत आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांना वेगळं करणाऱी गोष्ट म्हणजे निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन. अभिषेक बॅनर्जी यांचा आक्रमकपणा, तृणमूल काँग्रेससाठी संपर्काचं माध्यम आणि पदभार स्वीकारणे हे स्पष्टपणे दर्शवते की त्यांनी २०२६ च्या बंगाल निवडणुकीसाठीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी दोनदा बिहारला भेट दिली आहे. मात्र, पक्षातील नेते अजूनही जागावाटपाच्या चर्चेबाबत स्पष्टतेची वाट पाहत आहेत. बिहारमध्येही अग्निवीरांची संख्या मोठी आहे आणि राज्यातील अनेक तरुण संरक्षण कुटुंबांशी संबंधित असल्याने पहलगामचा मुद्दा निवडणुकीच्या काळात चर्चेत येऊ शकतो. इतकंच नाही तर अनिर्णयशील नितीश कुमार आणि अनिश्चित सरकार हे काँग्रेस आधीच पुढे नेऊ शकते. मात्र, यासाठी विरोधी पक्षनेता असणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीआधी अजिबात वेळ वाया जाऊ नये याची काळजी अभिषेक घेत आहेत आणि सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडता येईल असा कुठलाही मुद्दा आता त्यांना सोडायचा नाही. ममता बॅनर्जी यांचा वरदहस्त अभिषेक यांच्यावर आहेच, मात्र त्यांना ‘भाईपो’ हा टॅग काढून टाकायचा आहे हे स्पष्ट आहे. राहुल गांधींच्या बाबतीत अनेकांना वाटते की त्यांचे आडनाव त्यांच्यासाठी उपयोगी ठरते, त्यांच्या चुका झाकल्या जातात. दरम्यान, येत्या काही महिन्यांतच बिहार आणि बंगाल निवडणुका हे ठरवू शकतात की विरोधी पक्षाच्या पिढीचा वारस कोण असेल.