छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघात मराठा- ओबीसी आरक्षणाभोवतीच प्रचाराची छुपी चर्चा होत आहे. शेतकरी आत्महत्या, चारा-पाणी टंचाई हे सर्वसामान्यांना भेडसावणारे मुद्दे प्रचाराबाहेर असून रेल्वेचा मुद्दा अधून-मधून केंद्रस्थानी आणला जात असल्याचे चित्र आहे. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात खरी थेट लढत होत असून त्याला ओबीसीविरुद्ध मराठा, असा जातीय रंग चढवण्यात येत आहे. त्यात यशवंत गायके हे ओबीसी बहुजन पक्षाचे तर अशोक हिंगे हे वंचितचे उमेदवार आहेत. हिंगे मराठा तर गायके ओबीसी असल्याने पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांना मतविभाजनाचा कितपत फटका बसतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच, परंतु निवडणुकीत आरक्षणच प्रचारातला छुपा चर्चेतला मुद्दा आहे. विशेषत: ग्रामीण भागात. तर मेळावे, जाहीर सभांमधून विकासाचे स्वप्न दाखवले जात आहे. पण नेमका विकास काय हे थेट सांगितले जात नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतच्या प्रारुपा भोवती चर्चा झडवली जात आहे. पंकजा मुंडे या त्यांच्या पालकमंत्री, ग्रामविकास मंत्रीपदाच्या कार्यकाळात दिलेल्या विकास निधीवर बोलत आहेत. तर बजरंग सोनवणे हे रेल्वेचा मुद्दा व ‘मी शेतकरी पुत्र’ म्हणूनच प्रचार करत आहेत. महायुती व महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या-त्यांच्या प्रभावक्षेत्रात प्रचारात असले तरी परस्परांवर कुरघोडी करून अस्तित्व कसे सिद्ध करता येईल, याच्या गोळाबेरजेतच ते गुरफटल्याचे दिसत आहे.

बीड जिल्ह्यात सध्या चारा-पाणी टंचाईचे भीषण स्वरुप आहे. माजलगाव धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणी साठा आहे. बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यात मागील तीन महिन्यात २१५ च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून त्यात सर्वाधिक बीडमध्ये आहेत. बीडमधील शेतकरी आत्महत्यांची संख्या ४५ पर्यंत पोहोचली आहे. मागील तीन महिन्यातील ही संख्या आहे. त्याला राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याची जोड चिटकत आहे. बीड जिल्ह्यात प्रत्येक दुष्काळात चारा छावण्या उभारल्या जातात. राजकीय पुढाऱ्यांसाठी कुरण म्हणून चारा छावण्यांकडे पाहिले जाते. मार्च-एप्रिल महिन्यापासूनच चारा छावण्यांची तयारी सुरू झालेली असते. यावेळी चारा छावण्यांचाही मुद्दा कुठेही चर्चेत आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानेही सर्वाधिक नुकसान हे बीड जिल्ह्यात असून ९७ गावांमधील सुमारे एक हजार २० पेक्षा अधिक हेक्टरवरील शेतीक्षेत्र बाधित झाले आहे.

article about badlapur school sexual assault case sexual harassment against women and girl
तिला कणखर करणे महत्त्वाचे!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?
Maratha Reservation, reservation,
आंदोलनांना बळी पडून आरक्षण दिले, तर राज्यातही बांगलादेशसारखी परिस्थिती, आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा दावा
Sheikh Hasina head of state in Bangladesh in the Indian subcontinent has always faced conflict
उठाव, बंड, हत्या… भारतीय उपखंडातील महिला राष्ट्रप्रमुखांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष?
loksatta analysis why controversy over 18 percent gst on insurance
विश्लेषण: विम्यावरील १८ टक्क्यांच्या जीएसटीबाबत एवढा वाद का?
hindus attacked in bangladesh
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू धोक्यात; भारतासमोर हिंदू निर्वासितांच्या आश्रयाचे संकट?
loksatta analysis wayanad disaster in light of gadgill commission report
पश्चिम घाट पर्यावरण संवर्धनासंदर्भात माधव गाडगीळ समिती अहवाल काय आहे? अहवालाकडे दुर्लक्षामुळेच वायनाडमध्ये प्रलय? 

हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट

मनोज जरांगे यांचा दौरा

बीडमधील पाटोदा तालुक्यात मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाले. सोनेगाव येथे त्यांची पेढेतुला करण्यात आली. तर इतर गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे यांच्या दौऱ्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, गावपातळीवर नेत्यांना खडेबोल सुनावण्यासाठी मराठा समाजातील तरुणांना बळ मिळाले आहे. स्थानिक महायुतीतील मराठा नेत्यांची पंचाईतही झाली आहे. तर धनंजय मुंडे यांनी मराठा समाजातील तरुणांची यापूूर्वी बोलावलेल्या बैठकीला अल्प प्रतिसाद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा जिल्ह्याबाहेर सोमवारी बैठक घेतल्याचीही चर्चा रंगली आहे.