नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतघोटाळ्याकडे लक्ष वेधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ् बावनकुळे यांच्या कामठी मतदासंघात मतदारसंख्येत झालेल्या वाढीचे उदाहरण दिल्याने बावनकुळे संतप्त झाले आहेत. राहुल गांधी यांनी अभ्यासकरून बोलावे, नागपुरात येऊन बघावे, टीका त्यांनी शनिवारी नागपुरात केली.
राहुल गांधी यांचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानावर आक्षेप घेणारा व आयोगाला काही प्रश्न विचारणारा लेख दैनिक लोकसत्तात प्रकाशित होताच त्याचे राजकी वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. राज्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही शनिवारी नागपुरात होते. त्यांनी राहुल गांधी यांच्या लेखावर प्रतिक्रिया दिल्या.

खरे तर गांधी यांनी आयोगाला प्रश्न केेले होते. पण भाजपनेच त्यावर प्रतिक्रिया दिली. ती देताना राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला थेट उत्तर न देता ‘त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे’, अशी टीका फडणवीस यांनी तर ‘तो पिसाळले आहेत’ अशी व्यक्तिगत स्वरुपाची टीका बावनकुळे यांनी केली. टिकेचा व्यक्तिगत रोख लक्षात घेता राहुल यांनी मारलेला बाणा लक्ष्यभेद करणारा तर ठरला नाही ना ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

कामठी पुन्हा ऐरणीवर

राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखात कामठी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेली मतदारसंख्येतील वाढ याकडे लक्ष वेधले आहे. मतदार स्थलांतरणाचे कामठी एक उदाहरण आहे, असे राहुल गांधी म्हणाले. २०२४ च्या लोकसभा मतदारसंघात कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला १.३५ लाख तर महायुतीला १.१९ लाख मते मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लोकसभेत मिळवलेले१.३५ लाख मते कायम ठेवली, पण भाजपच्या मतांमध्ये १.१९ लाखावरुन १.७५ लाखांपर्यंत म्हणजे ५६ हजार मतांची वाढ झाली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान तब्बल ३५ हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली, त्यांनी भाजपला मतदान केले असावे अशी शंका राहुल गांधी यांनी व्यक्त केली. कामठी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले होते. त्यांना १ लाख ७४ हजार तर काँग्रेसचे सुरेश भोयर यांना १ लाख ३४ हजार मते मिळाली होती. बावनकुळे यांचे ४० हजार ९४६ मताधिक्य होते. मतदार संघात वाढलेली मते निर्णयाक ठरली असे राहुल गांधी यांचे मत आहे.

बावनकुळेंचे प्रतिउत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांच्या आरोपावर बावनकुळे यांनी उत्तर दिले. .ते म्हणाले राहुल गांधी यांनी अभ्यास करून बोलावे, सलग तीन विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी तीस हजार मते या मतदारसंघात वाढली. शहरी भाग जोडल्या गेल्यानेही मतदारांची भर पडली. नवीन मतदारसनोंदणी मध्ये १७०००मते काँग्रेसने नोंदवलेली आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत, त्यामुळे राहुल गांधी यांनी संभ्रम निर्माण करू नये, असा आरोप बावनकुळे यांनी केला.