Mian controversy Assam Assembly: आसाममधील बंगाली वंशाच्या मुस्लिमांसाठी “मियाँ” एक अपमानजनक शब्द आहे आणि बऱ्याचदा तो राज्यातील वादांच्या मुळाशी असतो. आता, हा शब्द विधानसभेतही पोहचला आहे. सत्ताधारी भाजपा नेत्यांनी या शब्दाचा विधानसभेत वापर केल्याने या आठवड्यात सलग दोन दिवसांसाठी सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी “मियाँ” या शब्दाच्या वापरावर आणि राज्यात अशी विधाने करणे राजकीय संस्कृतीचा भाग बनत असल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे भाजपाने सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशाचा दाखला दिला आहे. ज्यामध्ये, “एखाद्या व्यक्तीला “मियाँ-तियाँ” आणि “पाकिस्तानी” म्हणणे “वाईट” असू शकते परंतु ते धार्मिक भावना दुखावणारा गुन्हा नाही.

काय आहे मियाँ वाद?

मंगळवारी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि पाटबंधारे मंत्री अशोक सिंघल यांनी त्यांच्या मतदारसंघातील ढेकियाजुली येथे एका कार्याक्रमात केलेल्या विधानांबद्दल चर्चा सुरू असताना विधानसभा पहिल्यांदा २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर विशेषाधिकार भंग प्रस्तावासाठी आग्रह धरल्याने ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या सर्व आमदारांना निलंबित करण्यात आले.

आसामच्या नव-वैष्णव परंपरेतील धार्मिक संदेश देणारे पारंपारिक नृत्यनाट्य – भाओना कार्यक्रमात बोलताना सिंघल “मियाँ” लोकांना दुकाने लावू देऊ नका असे सांगत असल्याचे एका व्हिडिओमध्ये ऐकू येते.

“आपली मुले ईदमध्ये जात नाहीत. प्रत्येकाची स्वतःची जागा असते. तुमचे स्वतःचे जेवण असते, तुमचे स्वतःचे कपडे असतात, तुमच्या स्वतःच्या परंपरा असतात. त्यांच्या स्वतःच्या परंपरा असतात आणि तुम्ही त्यांना येथे दुकाने लावू देता. माझ्या मतदारसंघात असे होऊ शकत नाही,” असे मंत्री व्हिडिओमध्ये म्हणताना ऐकू येते.

मंगळवारी विधानसभेत एआययूडीएफचे आमदार रफीकुल इस्लाम यांनी सिंघल यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु नियमांनुसार प्रस्तावाच्या आवश्यकता पूर्ण होत नसल्याने अध्यक्षांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला.

बुधवारी, काँग्रेसचे आमदार शेरमन अली यांनी विधानसभेत मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांचे वर्णन करण्यासाठी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. भाजपाचे आमदार रूपज्योती कुर्मी यांनी अली यांना लक्ष्य केल्यानंतर हा वाद आणखी वाढला, त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी कुर्मी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

ही घटना घडली तेव्हा सभागृहाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या नुमल मोमीन यांनी सांगितले की, “हा शब्द वगळण्यात येईल, परंतु “मियाँ” या शब्दात काहीही धार्मिक नाही”.

ही भाष राजकीय संस्कृतीचा…

“मंत्र्यांच्या असंवैधानिक विधानांनंतर, आज एका आमदाराने विधानसभेत वांशिक विधान केले. सत्तेत असलेले लोक अशा प्रकारच्या गोष्टी बोलत राहतात. ही भाषा राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक भाग बनत चालली आहे,” असे रफीकुल इस्लाम यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

“आमदार किंवा मंत्र्याने अशी विधाने करणे दुर्दैवी आहे. ते विधानसभेत येण्यापूर्वी आणि पदभार स्वीकारण्यापूर्वी संवैधानिक शपथ घेतात. पण, मंत्रीच लोकांना दुसऱ्या समुदायाविरुद्ध चिथावणी देत ​​होते आणि त्यांनी धार्मिक विधान केले. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. ते त्या पदासाठी पात्र नाहीत.”

भाजपाकडून मंत्र्यांचा बचाव

सिंघल यांचा बचाव करताना, आसाम भाजपाचे प्रवक्ते मनोज बरुआ म्हणाले, “अशोक सिंघल म्हणाले आहेत की त्यांच्या मतदारसंघात एका धार्मिक कार्यक्रमासाठी तयारीबाबत बैठक झाली होती, जिथे त्यांनी हे विधान केले. हा हिंदू-मुस्लिमांचा प्रश्न नाही. प्रत्येक धर्माच्या सणांमध्ये, त्या त्या धर्माचे लोक व्यवसाय करतात. सरकारचा एक जबाबदार सदस्य म्हणून, ते जे बोलत आहेत ते यापुरते मर्यादित आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुपज्योती कुर्मी यांच्याशी संबंधित वादावर, बरुआ म्हणाले, “अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हा काही अपशब्द नाही.