नॅशनल कॉन्फरन्समध्ये मोठे मतभेद झाल्याने काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पक्षाचे खासदार आगा रुहुल्ला मेहदी यांच्यातला वाद आता समोर आला आहे. याबाबत सारवासारव करीत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताना पक्षाने असा दावा केला आहे की, पक्षाची बैठक अगदी शांतपणे कोणताही वाद न होता पार पडली आणि मेहदी हे अचानक बैठकीतून निघून गेलेले नाहीत.
खासदारांची नाराजी
श्रीनगरचे खासदार काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून नॅशनल कॉन्फरन्सच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मात्र, शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या वैचारिक भूमिकेपासून दूर राहणे पसंत केले आणि निवडणूक जाहीरनाम्यात लोकांना दिलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नॅशनल कॉन्फरन्सच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, मेहदी यांनी मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारले आहेत. अब्दुल्ला यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत जाहीरनाम्यात दिलेली मुख्य आश्वासनं ते विसरले आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. विशेष दर्जा पुनर्संचयित करणे आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळवून देणे अशा आश्वासनांचाही त्यात समावेश आहे. पक्षातील सदस्यांनी ओमर यांच्या प्रशासनाची प्रशंसा केल्याने आणि कार्यकारिणीच्या बैठकीबाबत वक्तव्य केल्याने मेहदी नाराज झाल्याचे म्हटले जाते.
“आपण आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या मुख्य आश्वासनांना विसरून लोकांशी विश्वासघात करीत आहोत”, असे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना सांगितले. “आपला लढा कलम ३७० साठी आहे; दैनंदिन शासन कारभारासाठी नाही. त्यात राज्यत्वाचा समावेश आहे; पण हे त्यापलीकडे जाते. राजकीय कैद्यांची सुटका, स्वायत्तता आणि जम्मू-काश्मीरची संविधानिक ओळख यांच्या बाजूने भूमिका घेण्यातही पक्ष अपयशी ठरला आहे,” असे मेहदी यांनी म्हटले आहे.
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा, ओळख, आरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरील भूमिकेमुळे श्रीनगरचे हे खासदार खोऱ्यात लोकप्रिय झाले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पक्षाच्या सर्वांत जास्त मागणी असलेल्या स्टार प्रचारकांपैकी एक होते; मात्र ही परिस्थिती फार काळ टिकली नाही आणि गेल्या वर्षीच्या अखेरीस खासदाराने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांनी आरक्षण धोरणाचे सुसूत्रीकरण करण्याची मागणी केली. त्यावेळी ओमर आणि मेहदी यांच्यात संवाद होऊ शकत नाही, असे मेहदी यांनीच सार्वजनिकरीत्या कबूल केले होते.
शनिवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या सूत्रांनी सांगितले की, मेहदी यांच्या टीकेमुळे आश्चर्यचकित झालेल्या ओमर अब्दुल्ला यांनी असे निदर्शनास आणून दिले की, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरच लोकांची प्रतिष्ठा, ओळख आणि अधिकार यांसारखे महत्त्वाचे मुद्दे सोडवता येऊ शकतात. त्यांनी मेहदी यांना पुढील विधानसभा पोटनिवडणूक लढविण्यास आणि सरकारचा भाग म्हणून टिकून राहण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना असेही सांगितले की, यापूर्वी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर ते निवडणूक लढविणार नाहीत, असे मेहदी यांनी म्हटले असले तरी पक्षाने संसदीय निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.
मात्र, बैठकीला उपस्थित असलेल्यांची मतेही मेहदी यांना पटली नाहीत. तुम्ही माझ्याकडे आलात हे स्पष्ट करू, असे मेहदी यांनी ओमर अब्दुल्ला यांना बैठकीदरम्यान शांततेत सांगितले. त्यानंतर त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या मूळ कारणाबद्दल पुन्हा स्पष्टता मिळविण्यात मदत झाल्यास संसदेतून राजीनामा देण्याची ऑफर दिली. मेहदी यांनी यावेळी असेही म्हटले की, लोकांशी साधलेल्या संवादातून असे दिसून आले की, जो पक्ष एकेकाळी सत्तेपेक्षाही वर असलेल्या गोष्टींना महत्त्व देत होता, त्या पक्षाबाबत लोकांच्या मनात भ्रमनिराशा व निरंकुशते भावना असल्याचे जाणवते.
बैठकीत ओमर यांनी मेहदी यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि पुढे त्यांनी म्हटले, “मेहदी हे केंद्रशासित प्रदेशातील काही लोकांना भेटतात, जे त्यांना मूलभूत शासन हवे असल्याचे वारंवार सांगतात.” ओमर यांच्या या विधानानंतर मेहदी बैठकीतून बाहेर पडले.
दरम्यान, पक्षाच प्रमुख प्रवक्ते तन्वीर सादिक यांनी मेहदी बैठकीतून निघून गेल्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. त्यांनी म्हटले, “आगा रुहुल्ला मेहदी यांनी कोणताही सभात्याग वगैरे केलेला नाही. ते चर्चेदरम्यान उपस्थित होते आणि चर्चा शांततेत व सुरळीतपणे पार पडली. मेहदी यांनी बैठकीतून बाहेर जाण्याआधी रीतसर परवानगी घेतली होती.”
नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याने सांगितले, “मेहदी यांची भूमिका व्यावहारिक नाही आणि ओमर अब्दुल्ला हेदेखील वास्तववादी आहेत. त्याशिवाय ही एक दीर्घ लढाई आहे आणि आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागेल. आपण लोकांना शत्रू बनवू शकत नाही. रुहुल्लासाहेब हे समजून घेतील आणि इतर नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून पुढे जातील.”