कविता त्या-त्या वयाचा खऱ्या अर्थाने आरसा असतो. त्यात आणि अपरिपक्व असण्यात मजाही असते, असे मत प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी व्यक्त केले.
टाटा मोटर्सच्या ‘कलासागर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन खरे यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी संगमनाथ दिग्गी, व्ही. सुरेश, विष्णूपंत नेवाळे, सुभाष हुलावळे, बबन चव्हाण, सुरेंद्र गाडगीळ, बाबा राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खरे म्हणाले, कविता ठरवून करता येत नाही. अगदी झोपेतही कविता सुचू शकते, त्यासाठी कसलाही नियम नाही. कविता सुचल्यावर आळस केल्यास ती पुन्हा सुचत नाही. कमी लिहिणे आणि जास्त निरीक्षण करण्याने कविता होत राहिल्या. प्रेक्षकांना कवितेशी बोलायचे असते. मात्र, कवितेशी बोलता येत नाही म्हणून ते कवीशी बोलत असतात. कलेला राजाश्रय असावा लागतो, तो टाटा मोटर्सने ‘कलासागर’च्या माध्यमातून दिला आहे. प्रसन्न हळबे यांनी सूत्रसंचालन केले. सुशील राणे यांनी आभार मानले.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…