पुणे : आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये निश्चित होणार आहे. सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या निमंत्रण आलेल्या चार स्थळांना साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार असून, २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा येथील संमेलनाला जेमतेम ८० दिवस झाले असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आता आगामी ९७ व्या साहित्य संमेलनाचे वेध लागले आहे. आगामी संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणांहून निमंत्रणे साहित्य महामंडळाकडे प्राप्त झाली आहेत. साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर २३ एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या अहवालावर चर्चा होऊन आगामी संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली.

Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध
elelction 38 applications filed in Maval for lok sabha election pune news
मावळमध्ये ३८ जणांचे अर्ज दाखल; ‘संजोग, वाघेरे’ नामसाधर्म्य असलेले दोन उमेदवार रिंगणात
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
sharad pawar slams amit shah over knowledge about agriculture
‘अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित’, शरद पवार यांचा टोला

हेही वाचा – नवउद्यमींकडून कर्मचारी कपातीचे सत्र; मंदीच्या सावटामुळे देशभरात २३ हजार जणांनी  नोकऱ्या गमावल्या

हेही वाचा – पाच नवी कारागृहे बांधण्याचा प्रस्ताव; राज्यातील ६० तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी

दोनच वर्षांपूर्वी म्हणजे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उदगीर येथे झाले होते. त्यामुळे जालना या स्थळाचा विचार होण्याची शक्यता कमी दिसते. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा, औदुंबर येथील औदुंबर साहित्य मंडळ आणि अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ या तीन स्थळांपैकी एकाचा विचार होईल, याकडे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले.