पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होताच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर सावध भूमिका घेतली आहे. आधी सर्व चित्र स्पष्ट होऊ द्या मग मी यावर बोलेल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात भाजपा हे जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे. शेतकरी आणि आरक्षण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या समाजविरोधात बळाचा वापर केला जातो आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आणखी वाचा-उन्हाचा ताप वाढला, पालेभाज्यांच्या दरात वाढ

Loksatta ulta chashma Elections Gram Panchayat constituency MLA
उलटा चष्मा: कसले मानव हो तुम्ही?
Chandrashekar bavankule marathi news loksatta
“काँग्रेसला पाकिस्तानचे झेंडे फडकवायचे आहेत”, श्याम मानव यांच्या आरोपांवरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
पंचमसाळी लिंगायत आणि कर्नाटकमधील राजकारण; ओबीसींमधून आरक्षणाची मागणी का केली जात आहे?
economic survey report uncertainty in job sector due to ai
‘एआय’मुळे नोकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचा इशारा
mp women burried
रस्त्याच्या बांधकामाला विरोध केल्याने दोन महिलांना मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडलं; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना!
Mamata Banerjee
“बांगलादेशातील पीडित नागरिकांसाठी आमचे दरवाजे उघडे”; हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर ममता बनर्जींचे मोठं विधान!
bear attacks in Japan is looking to ease laws around shooting bears
माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?
Unnatural abuse, dog, abuse,
श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता

आदित्य ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे यांच्यावर काही बोलणार नाही. सर्व चित्र स्पष्ट होऊ द्या. परंतु, अंतरवली सराटीत लाठीचार्ज झाला, त्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले की मुख्यमंत्र्यांनी? याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे. लोक न्याय हक्कांसाठी लढत आहेत. त्यांच्या विरोधात बळाचा वापर केला जात आहे. शेतकरी आणि आरक्षणासाठी लढणाऱ्या समाजाच ऐकून घ्या, चर्चा करा. अस न करता हे सरकार हुकुशाही करत आहे. पुढे ते म्हणाले, जातीत आणि धर्मांत भांडणं लावायचं काम भाजप करत आहे. हे विष पेरून काही होणार नाही. राजकारणाचा चोथा झाला आहे. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.