पुणे : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाअंतर्गत भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर अनेक गैरप्रकार झालेली, पोलिसात तक्रारी दाखल झालेली तलाठी भरती का रद्द केली जात नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित पदासाठी २० आणि २१ फेब्रुवारी रोजी टीसीएस कंपनीमार्फत घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेदरम्यान औरंगाबाद केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या परीक्षेवर उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षा व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
west bengal teacher recruitment scam in marathi
विश्लेषण: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा नेमका काय? शिक्षकांवरच वेतन परत करण्याची वेळ का आली?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

हेही वाचा…पिंपरी : थेरगावात ६० खाटांचे कर्करोग रुग्णालय

तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकारांबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतले आहेत, तसेच त्या विरोधात आवाज उठवला आहे. जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा हा निर्णय चांगला आहे, पण या परीक्षांपेक्षा जास्त घोळ तलाठीमध्ये झाला आहे. मग तलाठी भरती का रद्द केली जात नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. तलाठी भरतीवर जवळपास नऊ एफआयआर दाखल आहेत.

हेही वाचा…साखरेची ‘गोड’ बातमी : यंदा साखर मिळणार मुबलक

लातूरमध्ये पूर्ण केंद्रच मॅनेज होते हे सिद्ध झाले आहे, ते केंद्रही बंद केले आहे तरी तलाठी भरती रद्द का नाही? यांच्यात कोणाचे हितसंबंध आहेत का? जवळपास 74 जण संशयित म्हणून महसूल विभागाने यादी जाहीर केली आहे, तरीही तलाठी नियुक्ती दिली जात आहे, अशी टीकाही समितीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे केली.