देहू : देहू संस्थानच्या विश्वस्तांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. देहूच्या दीडशे एकर गायराना पैकी ५० एकर गायरान हे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु आहेत. याला देहूकरांचा विरोध असून हे गायरान देहूकरांच्या हक्काचं आहे, गायरानाला वारकरी भवनासह इतर वास्तू उभारण्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावं, अशी मागणी देहूच्या विश्वस्तांनी केली आहे. जोपर्यंत सरकार आमच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यावर ठाम असल्याची भूमिका देहू संस्थानच्या विश्वस्तांनी मांडली आहे. ‘गायरान वाचवा…गाव वाचवा’ असे म्हणत त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या प्रवेश द्वारासमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड मधील प्रदूषण घटले, धुलिकणांचे प्रमाण किती?

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
thane corporation headquarter MNS agitation football Borivade ground encroachment
ठाणे पालिका मुख्यालयात मनसे पदाधिकारी खेळले फुटबॉल, बोरिवडे मैदान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
Eknath shinde Shiv Sena focus pune municipal elections
पुणे : शिवसेनेचे ४० ते ५० जागांवर लक्ष, महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू

देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले, वर्षातून पाच मोठ्या यात्रा देहूत होतात. आषाढी वारीच्या पालखी प्रस्थानावेळी लाखो भाविक देहूत दाखल होतात, चारशे दिंड्या असतात. आमची २००१ पासून मागणी आहे, की गायरान आम्हाला द्या. तेव्हा ५० एकर जागेची मागणी आहे. आता शंभर एकर जागा द्यावी ही मागणी आहे. वारकरी भवन, निवासस्थान, अतिथी भवन, संत विद्यापीठ, गोशाळा आणि पालखी तळासाठी गायरानची जागा हवी आहे. या मागणीची शासनाने ताबडतोब दखल घ्यावी. आमचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहील. लवकरात लवकर प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा. गायरानची जागा देहूकरांनाच द्यावी. अशी मागणी देहू संस्थानकडून करण्यात आली आहे.

Story img Loader