पुणे : राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात मार्च महिन्यात उष्माघाताची १३ प्रकरणे सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविली आहेत. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. तसेच, नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्यात १ ते २० मार्च या कालावधीत उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक चार जण बीड जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील दोन आणि अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात अद्याप उष्माघाताने एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक १३ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते.

Epidemic of waterborne diseases in the state
राज्यात जलजन्य आजारांची साथ! ‘ही’ काळजी घ्या…
Pune, water storage, state dams, heavy rains, 10.38%, 148.71 TMC, 47.30%, Konkan division, Pune division, Nashik division, Marathwada division, Amravati division, Nagpur division,
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७६ टीएमसी, गेल्या पाच दिवसांत १४८ टीएमसीने वाढ
imd warns heavy rain in maharashtra
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर
Why is the youth of the state displeased with the contractual recruitment for government posts
शासकीय पदांसाठी कंत्राटी भरतीवरून राज्यातील युवकांमध्ये नाराजी का?
Rain, Rain Dampens Demand of Fruits and Vegetables in Pune, Rain Dampens Prices for Fruits and Vegetables in Pune, Pune s Market Yard, pune news,
पाऊस वाढल्याने फळभाज्या, पालेभाज्या स्वस्त… दर काय?
health systems, Pune, laxity, health,
शहरबात : आरोग्य यंत्रणांमध्ये सुस्तावलेपणाची साथ
Winter Fever, Dengue, Winter Fever and Dengue Surge in Maharashtra, Winter Fever cases surge in Maharashtra, Dengue Surge in Maharashtra, Monsoon, Zika Cases Raise in Maharashtra, Zika virus, Maharashtra health system,
महाराष्ट्रात हिवताप, डेंग्यू आणि झिका अशा साथरोगांचा तिहेरी धोका?
Ajit pawar and uddhav thackeray (2)
“ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा…”, ठाकरे गटाची अजित पवारांवर बोचरी टीका!

हेही वाचा : विदर्भ, मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा इशारा; तापमानात होणार वाढ

राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत आरोग्य सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, की राज्यात बऱ्याच भागात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य यंत्रणांना उष्माघाताबद्दल दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, याबद्दलही सूचना करण्यात आल्या आहेत.

उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांनी त्याबाबत उपचाराचे नियोजन करावे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये ठेवावा. या आजारांवरील उपचारांचे प्रशिक्षण रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना द्यावे. लहान मुले आणि ज्येष्ठांना उष्माघाताचा धोका अधिक असल्याने त्यांची काळजी घेण्याबाबत जनजागृती करावी. उष्माघातापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती जनतेला द्यावी, असे निर्देश देण्यात आल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : देशातील गव्हाचा निच्चांकी साठा, जाणून घ्या नेमके कारण काय?

उष्माघातापासून संरक्षण कसे कराल…

  • दिवसभरात भरपूर पाणी प्यावे
  • कॅफीनयुक्त पेये अथवा मद्य टाळा
  • तीव्र उन्हात जाणे टाळा
  • सौम्य रंगाचे सुती कपडे वापरा
  • लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घ्या
  • पंख्यासह वातानुकूलन यंत्रणेचा वापर करा
  • दुपारच्या वेळी बाहेरील सार्वजनिक कार्यक्रम टाळा