पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिले. मोहोळ खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, अभिजित मानकर यांच्या कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

हेही वाचा : राज्यातील ४० गोशाळांसाठी ‘स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारणे आणि शेलार मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या मोबाइलमधील ध्वनिमुद्रित संभाषण (काॅल रेकाॅर्डिंग)तपासायचे आहे. मारणे आणि शेलार यांची अन्य आरोपींसोबत समोरासमोर चौकशी करायची आहे. मारणे आणि शेलारच्या कोठडीत वाढ करण्यात यावी. मोहोळवर गोळ्या झाडणारा आरोपी पोळेकर, कानगुडे, शेळके, गांदले, मानकर यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि विशेष सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकर यांनी केली. बचाव पक्षाकडून ॲड. राहुल देशमुख, ॲड. केतन कदम, ॲड. दादासाहेब भोईटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मारणे आणि शेलार यांच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. अन्य आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. मोहोळचा खून केल्यानंतर गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार पसार झाले होते. दोघांना कोणी मदत केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.