पुणे : हवामानाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने (रासप) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व ‘रासप’चे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक रुपनवर यांनी केले. रासपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे, पिंपरी -चिंचवड शहराध्यक्ष परमेश्वर बुरले, डी. के. पाटील, सुनीता किरवे, वैशाली जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. दरम्यान, मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.