पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमधील म्हाळुंगे, चाकण, भोसरी एमआयडीसी या औद्योगिक पट्ट्यातील २६ सराइतांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. म्हाळुंगे एमआयडीसीमधील तीन, भोसरीतील ११, चाकणमधील एक, चिखलीमधील आठ, दिघीतील तीन गुन्हेगारांचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये १९ जणांना दोन, तर सात जणांना एक वर्षासाठी तडीपार केले असून, याबाबतचा आदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिला.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरद ज्ञानेश्वर मोरे (वय २७, मुळशी) याला दोन वर्षांसाठी, तर स्वयम सबाजी सावंत (वय २७), सोनू बहिरू केदारी (वय २९, खेड) या दोघांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. भोसरी एमआयडीसीच्या ठाण्याच्या हद्दीतील जीके ऊर्फ गणेश संतोष कोठावळे (वय १९, चिखली) याच्या टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. टोळीतील सदस्य ससा ऊर्फ प्रतीक कैलास गजरमल (वय १९, चिंचवड), रोहित राजू बजलव (चिखली), व्हीपी ऊर्फ विशाल हनुमंत पोळ (वय २१, चिखली), बच्चा ऊर्फ दिग्विजय अनंत गायकवाड (वय १९, चिंचवड) यांच्यावर कारवाई झाली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

केतन सोनवणे ऊर्फ चेप्या (वय २६, पिंपरी), सचिन बाळू धांडे (वय २०), दीपक गोरख धांडे (वय २४), राहुल भारत जाधव (वय २०) यांना दोन वर्षांसाठी, तर विजय बाळासाहेब साळवे (वय २२, मोशी), ज्ञानेश्वर वसंत दुनघव (वय २२) यांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. चाकण पोलीस ठाण्यातील नंदा रंगनाथ साळुंके (वय ५०) हिला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तिच्यावर गांजा विक्रीप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत.

चिखलीतील आकाश ऊर्फ सुमीत ऊर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहळ (वय १९), संग्राम दत्तात्रय पवार (वय २९, चिखली), सुमीत गणेश पिल्ले (वय ३२), कनिष्काराज ऊर्फ राणा अरुण सुरवसे (वय २१, चिखली), कुणाल बाळकृष्ण भंडारी (वय २३, मोईगाव, खेड) यांना दोन, तर तेजस नीलेश गायकवाड (वय २०), रोहन शंकर पंडित (वय २३, चिखली) यांना पुणे जिल्ह्यातून आणि मारुती मांजरीया राठोड (वय ४५, निगडी) याला एक वर्षासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून तडीपार केले आहे. दिघी ठाण्याच्या हद्दीतील गजानन गोविंद भोसले (वय २८, लोहगाव, पुणे), जयंता हरिपद सरकार (वय २९, दिघी), अक्षय नंदू पठारे (वय २०, चऱ्होली) यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत परिमंडळ तीनच्या हद्दीतील ९१ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. तसेच १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष आहे. – डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त