पुणे : देशाच्या १८ राज्यांतील सुमारे चार हजार कलाकारांचा सहभाग असलेल्या २१ व्या राष्ट्रीय ललित कला महोत्सवाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत समारोप झाला. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनेस्को यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी, मणिपुरी, कथकली, ओडिसी तसेच हिंदुस्थानी, कर्नाटकी गायन तसेच अनेक प्रकारचे वाद्यवादन अशा विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले.
ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अभिनेत्री व नृत्यदिग्दर्शिका अनुपमा सत्यांजली, गायिका बुलबुल बोस, संगीत अभ्यासक स्नेहा पेठकर, नृत्यांगना अनुपमा मोहन, अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, हेमंत वाघ, संजय भुजबळ या वेळी उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, ‘सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात असा राष्ट्रीय दर्जाचा महोत्सव गेल्या दोन दशकांपासून होत आहे, याचे कौतुक वाटते. कलेमध्ये स्पर्धा नसते हे ध्यानात घेऊन कलाकाराने त्याची कला अविरतपणे सादर करत राहावी.